गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

नाक दाबा तोंड उघडेलच ...!
                    आता पर्यंत भारताने केवळ शांततेची कबुतरे सोडली आहेत परंतु त्याच्या  उत्तरा दाखल पाकिस्तानणे आपल्याच हद्दीत येउन आपल्याच सैन्याचे शीर छाटून नेण्याचे धाडस करणे म्हणजे पाटीमागून वार करण्या सारखेच आहे.सीमेवरील धाडस कमी कि काय म्हणूनच एक प्रकारचा धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न  मलिक यांनी केला.खर तर आजपर्यंत स्वताच्या पाकिस्तान मधेच कितेकदा त्यांच्याच खेळाडूंला ला सामना हरले म्हणून मार वा द्वेष दिला गेला आहे.त्या वेळी जर भारताने या वर वक्तव्य केली असती तर याच पाकिस्ताने त्याचा मोठा बाऊ केला असता.भारत शांतता प्रिय,संयमी देश आहे म्हणून कोणीही उठून भारता बाबत बोलावे हा पायंडाच पडला आहे.यात अमेरिका हि कमी नाही वा पाकिस्तान.
         भारता कडून होणारी सर्व मदत ,व्यापार ,वा क्रीडा सामने तात्काळ बंद करावे जेणे करून ''नाक दाबले कि जगण्यासाठी तोंड उगडलेच जाते'' त्या प्रमाणे पाकिस्तान पुढे अडचणी उभ्या राहिल्या शिवाय त्यांचा हा उधळआपट पणा थांबणार  नाही.आता वेळ केवळ येणाऱ्या संकटाना पेलण्याची नव्हे तर आव्हान देण्याची आहे.बाह्य सिमेवरी वातावरण गरम करून अंतर्गत शांतता भंग करण्याचा प्रयत्न अश्या धार्मिक  बाबींवर 'शाहरुखचे' पात्र उभे करून पाकिस्तान करत आहे.एकंदरीतच पाकिस्तानणे स्वताचे घराचे वासे मोजावे तेच भक्कम करावेत.दुसर्याच्या घराच्या वाशांची काळजी न करणेच योग्य ठरेल. 
प्रभात ,कॉलेज कनेक्ट  ०२ फेब्रुवारी २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा