गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६


तरिही प्रेमाचा गुलकंद तसाच.....!
       आमची युवा पिढी पुर्वी प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबी पञांचा वापर करत  पुढे आमच्याकडे मोबाइल आले आणि आमच्या प्रेमात आधुनिकता आली त्याहि पुढे फेसबुक,नेट आले एका likeवर प्रेमाचे बहर सुरु झाले.
          परंपरेने चालत आलेल्या काण्हेरी,मोगरयाच्या फुलांची जागा गुलाबाने कधी घेतली कळलेच नाही. पुर्वी प्रेम,लग्न व नातेसंबध जुळले जायचे आता त्याही पुढे जावुन आम्ही हि परंपराच खंडित केली. लिव  इन रिलेशनशीप हि प्रेमाची गरजच बनवली.अगोदर बघणे,पसंद करणे सहवासात राहणे योग्य असेल तरच जीवनभर सोबत राहणे हि संकल्पणा एका दृष्टिने आपल्या संस्कृतीला तडा देणारिच पण तरिही आधुनिकतेनुसार योग्यच कारण काळा बरोबर बदलण हा माणसाचा नियम आहे अथवा इतिहास जमा गोष्टिणवर भविष्यकाळ ठरत नाहि हेही तितकेच खरे आहे.
         मोगरयाच्या जागी गूलाब येवो वा सामाजीक नातेसंबध परंपरेला छेद देत रिलेशनशीप येवो तरिही येवढे माञ निच्छित कि प्रेमाचा गुलकंद पुर्वी तोच होता आणि आजही तसाच मधुर आहे......!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा