वृंदावन,मथुरा,काशी आणि रामेश्वर कोणाला
ज्या अभाग्याने
रायगड न देखिला त्याला…….
हिंदवी स्वराज्याचे उत्तराधिकारी छञपतींचे थोरले
पुञ संभाजी राज्यांनी
राजा शिवछञपतींच्या उपरांत स्वराज्याच्या गादिचा मान
स्वीकारताना केलेला रायगडाचा उल्लेख हा निश्चीतच या अफाट दरयाखोरयात
,राना-वनात निर्भीड जंगलाच्या सानिध्यात वसलेल्या किल्ले रायगडचा गौरवच
म्हणावा लागेल.
शिवछञपतींना ज्याने हिंदवी स्वराज्याचे शञिय कुलांवतस
होताना पाहिले,राजमाता जिजाउचे जीवन चरिञ ज्या मातीत घडले,ज्याने
मातृत्वाची अफाट जिदद् हिरकणीच्या रुपात पाहिली ,ज्याने महाराणी येसुबाईचा
महापरक्रम पाहिला आणि ज्याने हिंदवी स्वराज्याची राजधानी हेण्याचा बहुमान
मिळवीला या अशा अनेक स्थितीचा अखंड पणे साशीदार असलेल्या किल्ले रायगडाची
सफर आपल्याला हिंदवी स्वराज्याच्या सुर्वण काळात घेऊण जाईल यात शंका
नाही.
कोकण प्रदेशातील रायगड जिल्हयात सहयाद्री पर्वत रांगेत किल्ले रायगड
वसलेला आहे .गडावर जाण्यासाठी 1400 पायरया आहेत 18 व्या शतकात इंग्रजांच्या
ताब्यात गड आल्यावर इंग्रजांनी या सहयाद्रीच्या स्वर्गाची नासधुस
केली.रायगडचे प्राचीन नाव 'रायरी' असे होते. या बलाढ्य किल्ल्याची सफर
करायची म्हटंल्यास संपुर्ण एक दिवसाचा कालावधी पुरेसा होतो.
चला तर घेऊ
महादेवाचे नाव आणि सुरु करु किल्ले रायगडची सहल. हा खुबलढा बुरुज याला
पुर्वी चित दरवाजा असेही म्हणत आता आपल्याला दिसतोय तो उध्वस्त बुरुज.
उतारवयात
जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी
त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता
वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही
महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना
बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही
म्हणतात.पुढे गेल्यावर आपल्याला एक दरवाजा दिसतो या दरवाजास ‘नाणे दरवाजा’
असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा.या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस
पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास
अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.:
चित् दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे
घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत
टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून
दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक
प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा
दिसतात.:पुढे आपल्याला महादरवाज्या लागतो . महादरवाज्याच्या बाहेरील अंगास
वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत.
महादरवाज्याला दोन
भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती
भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही
भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा
आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवडा दिसतात तसेच
संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून
उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली
आहे.महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून
चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही
चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या
आहेत.महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव.तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या
इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास
जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर
सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थेयाच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे
गंगीसागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात.
जगदीश्र्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच
असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून
बांधकामात नक्षीकाम आढळते.: स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१
पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी
दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.: पालखी
दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला
मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत
राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या
अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो
दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त
चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३
फूट रुंद आहे. रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे
असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच
गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
--:राजसभा :----
महाराजांचा
राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा.आजही येथे शिवराज्यभिषेक सोहळा
साजरा केला जातो . राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच
पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे
सिंहासन होते. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग
आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या
इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी
पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे
म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून
१६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला.
२४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या
दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला.हा
राज्याभिषेक निश्चलपु
री गोसावी याच्या हस्ते पार पडला.
पुढे
नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरुन आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो
‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे.
पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील
बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून जवळजवळ
चाळीस फूट रुंद रस्ता आहे.महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे
देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ. शिर्काई ही गडावरील मुख्य
देवता.बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती,
ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच
महादेवाचे म्हणजे जगदीश्र्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक
मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की
भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्याच्या
भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते.
शिवाजी महाराज्यांची समाधी :---
हि जागा जिथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी
महराज्यानी चीर शांती घेतली . या बाबत एक ऎतिहसिक नोंद आढळते इंग्रज
आक्रमणा नंतर रायगडावरील शिवाजी राज्यांची समाधी जनतेच्या विस्मरणात गेली
होती . त्याचा पहिला शोध महात्मा ज्योतीराव फुले यांनी लावला . मंदिराच्या
पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची
समाधी.
दहनभूमी पलीकडे भग्र इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते
शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक
घराचा चौथरा दिसतो. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर
उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.: होळीचा माळ डाव्या हातास सोडून
उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ
दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.कुशावर्त तलावाजवळून घळीने
उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ
अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची
मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.
बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरुन टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच
एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता
निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर
वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी.
आणि हे टोक ज्याने अफाट अश्या मातृत्वाची जाणीव रायगडला करून दिली
होय हेच ते
हिरकणी टोक : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट
जाते ती हिरकणी टोकाकडे जाते.या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात.
बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ
नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे
तोफेच्या माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही
खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा होती .
चूकवु नहे असे काही ……. !
पाचाड खिंडीत रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५
मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची
गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असे म्हणू लागले आहेत.
जगातील
इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून
इथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर
येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला
आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते
पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.
या गुहेत सतत
एकापाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या
अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही
पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा.
रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्गयात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते.
अश्मयुगीन मानवाचे जुने वसतीस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा
उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा यांची अपूर्वाई येथे भेट देणाऱ्याला
जाणवते.
कसे जायचे …? राहण्याची सोय ? गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ ?
पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून
भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाड गावातून रायगडच्या दोरवाटेच्या
(रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या
१४३५ पायऱ्या चढून गेलो, की रायगडमाथा गाठता येतो. गडावर राहण्यासाठी उत्तम
सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे. त्यास १ मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा ७
ते ८ खोल्या आहेत . राहण्याची सोय विनाशुल्क आहे पण सध्या तिथे कधी कधी ३०
रु. प्रती माणूस असे घेतले जातात.गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ
पायथ्यापासून चालत गेलात तर २ तास ४० मिनिटे पाळण्याने गेलात तर ५ मिनिटे.
आणि हो गडावर जाण्या साठी दोन सोही आहेत एक रोप वे आणि दुसरी आपली पायवाट …
या सुंदर आणि बलाद्य किल्ल्याची सफर आपल्याला निश्चितच अविस्मरणीय वाटावी अशीच आहे …
श्रीकांत बोरावके