कळा ज्या लागल्या जीवा
कोणा एका श्रीमंताच पोर अनवाणी कडक ऊन्हात फिरायला
निघाल आणि कडक ऊन्हात त्याच ते पाय पोळुन निघाले तेव्हा ते घरि येऊन
वङिलांना म्हणाले कि साऱ्या रस्त्यावर चांमडे अंथरा जेणे करून माजे पाय
पोळणार नाहीत.या वर तो श्रीमंत म्हणाला अरे माझ्या सोनुल्या त्या परीस
तु तुज्याच पायात चप्पल घाल जेणे करून तुजे पाय पोळणार नाहीत.खर तर गोष्ट
साधी व सोपी आहे पण त्याचा मतितार्थ वेगळा घेण्याची गरज आहे.स्वताच्या
पायाला चप्पल असल्याने जगाला बसणारे चटके जाणवणार नाहीत हा उपाय असला तरी
ऐक पळवाटच म्हणावी लागेल सामाज्यापासून दूर जाण्याची.
आज राज्यावर पाणीटंचाईच भीषण संकट उभे आहे.परंतु ते
आमच्या वर न ओढवल्यान आम्ही आजही धूलवड साजरी करतोय.दुष्काळाची झळ ना कळ
प.महाराष्ट्रला आणि विशेषता पुण्याला बसत नसल्याने त्याची खंत आम्हा
पंताना कश्याला..! असच म्हंटल जातय
दुष्काळ पाहताना दिसणार द्रुष मनाला
टोचत आणि तेव्हा बोचत हे कि पाणी प्रश्नावरही
राजकारणाची पोळी भाजली जातेय.आज भेडसावणारा प्रश्न बिकट आहेच पण याचे
सोयरे ना सुतक राजकारण्यानला आहे का असतेच तर दिमाखदार शाही थाटातील विवाह
सोहळे,अभिष्टचिंतन सोहळे,साजरे करून त्या वर घोडे नाचवले नसतेच.जनतेचे
प्रश्न हे A.C हॉल मधे बसून सुटत नसतात त्या साठी शेतकरयांच्या गोठयापर्यंत
नाळ जोडलेलीच असावी लागते हे विसरले गेल्याचे जाणवते.
दुष्काळावर उपाय अनेक होते वा आहेत पाणी पंचायत,पाणलोट
क्षेत्र विकास व इतरही अनेक पण यातील कोणती सूत्र अंमलात आणली गेलीत ?
गेलीत ना जलसिंचन घोटाळ्याची. आणखीनही काय वाढून ठेवलय याचीच सामान्य
माणूस आशा करतोय व स्वताची झळ स्वताच सोसतोय प्रसंगी कवी भा.र.तांबे यांच्या ओळी सत्याची जाणीव करून देतात.
कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या
कुणाला काय हो त्याचे,कुणाला काय सांगाव्या उरी हा हात ठेउनी, उरीला शुल का जरी
समुद्री चहूकडे पाणी ,पिण्याला थेंबही नाही ....!
(प्रभात,कॉलेज कनेक्ट २२ फेब्रु २०१३ )