शहरात खाजगी क्लासचा वाढतोय व्याप ; सामान्यांना शिक्षण अवाक्या बाहेर
श्रीकांत बोरावके
आपल्या मुलाला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे तो अधिक हुशार आणि गुणवंत व्हावा या करिता आपल्या अतिरिक्त खर्चाला कात्री लावत मुलाला खाजगी क्लासला पाठविणाऱ्या पालकांमध्ये वाढ होत असून पिंपरी-चिंचवड शहरात सद्या खाजगी क्लासेसचा गोरख धंदा मोठ्या जोमात सुरु आहे.पण अशा पालकांमुळे ज्यांना या आभासी आणि खर्चिक शिक्षण पद्धतीत पडायची इच्छा नसते अशा गरीब कुटुंबातील पालकानाही अशा प्रवाहात वाहावे लागत आहे.काही शाळांमध्ये तर मुल खाजगी क्लासला जातात म्हणून वर्गात सविस्तर शिकविले जात नसल्याच्या तक्रारी कानावर येत आहेत तर काही ठिकाणी शाळेतील शिक्षकांचेच खाजगी क्लासेसे असल्याने वर्गात काही प्रकरणे शिकवली जात नसल्याचे समोर आले आहे.यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी खाजगी क्लासेस लावले नाहीत त्यांच शैक्षणिक नुकसान होत असून या बाबत तक्रार ही करता येत नाही.याही पेक्षा गंभीर प्रकार शहरात सुरु असून कॉलेज करण्यापेक्षा केवळ खाजगी क्लास करणारे विद्यार्थी असून यामुळे शहरात महाविद्यालये गुल्ल आणि खाजगी क्लासेस झाले फुल्ल अशी परस्थिती दिसून येत आहे.
खाजगी क्लासेसचा असा धंदा शहरात तेजीत असून त्याची फी महाविद्यालयांच्या शैक्षणिक फी पेक्षाही अधिक आहे.त्यातच अनेक क्लासवाले गुरुजी करोड पती झाल्याचे बोलले जात आहे.यात खाजगी क्लास पेक्षा पालकांची मानसिकता सुधारण्याची गरज असून आपला मुलगा खाजगी क्लासला गेला म्हणजे अधिक हुशार किवा चांगल्या गुणांनी पास होणार हा समज दूर करण्याची गरज आहे.या क्लासेसमुळेच शाळा-महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेची बोंंब झाल्याचे दिसते. त्यात हे क्लासेसवाले तरी कोण ? त्याच महाविद्यालयातील शिक्षक-प्राध्यापक असतात.दुकानदारी चालत नाही म्हणुन हमाली करण्याचा जणु काही ठेकाच धरला आहे की काय? असा प्रश्न प्रत्येकालाच पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र तरीसुद्धा या शिकवणींमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा म्हणुन प्रत्येकजन प्रयत्न करतांना दिसतात.शिकवणारांचा आवाज विद्याथ्र्यांपर्यंत चांगला पोहचावा म्हणुन प्रत्येक शिकवणीच्या खोलीमध्ये मोठ-मोठ्या आवाजाचे यंत्र बसवण्यात येत आहेत.
खाजगी क्लासेस म्हणजे जणू बिन मान्यतेच्या शाळाच बनत आहेत.
खाजगी क्लासेसला सरकारी मान्यता नाही त्यात या मध्ये शिकविणारे शिक्षकही
दर्जात्मक असतील याची खात्री नाही तरी आपल्या मुलाला अमुक क्लास मध्ये
प्रवेश मध्ये प्रवेश मिळावा याकरिता आग्रही असलेल्या पालकांची संख्या ही
वाढती आहे.त्या पेक्षा शासनाच्या अनुदानित शाळांमध्ये शासनाचा पगार घेऊन
शिकविणारे शिक्षण दर्जात्मक नसतील का ? याचा पालक तुसभर ही विचार करत
नाही.थोडक्यात खाजगी क्लासेसची शिकवणी ही ज्याच्या त्याची अंतर्गत बाजू
असली तरी यांमुळे सामाजिक समतोल ढासळला जात असून ही चिंतेची बाब ठरत
आहे.यांमुळे ज्यांची परस्थिती आपल्या किमान शिक्षण देण्याची नाही अशा गरीब
पालकांनाही इतरांच्या बरोबरीने आपल्या मुलांनी चालावे या करिता खाजगी
क्लासचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या क्लासेसचा त्रास केवळ दहावी -
बारावीतील विद्यार्थ्यानांच सहन करावा लागत नसून पहिली ते पदवी पर्यंतच्या
साऱ्यांच्याच पाठीवर हा बागुलबुवा आहे.यामुळे शाळा ही विद्यार्थ्यांच्या
गुणात्मक वाढीवर म्हणावे तसे लक्ष देत नसून ते ही हे काम खाजगीवाल्यांकडे
सोपवून वर्षभर निर्धास्त असतात.यामुळे च शहरात सद्या तेरी भी चूप मेरी चूप
असे प्रकार आहेत. महापालिकेच्या
१३६ प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा असून २०८ खाजगी शाळांचा समावेश
आहे.याबरोबरच पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये व अभियांत्रिकी
विद्यालये मोठ्या संख्येने शहरात आहेत.या नोदणी कृत आणि अधिकृत असल्याने
यांचा निश्चित असा आकडा सांगता येतो.यालट खाजगी क्लासेसची अधिकृत नोंद
नसून त्यांचा अंदाजे आकडा हजारोंच्या घरात आहे.
शासन कायदा करण्याच्या तयारीत …याबाबत काही प्रमाणात निर्बध यावेत या करिता शासन पातळीवर कायदा करणार असल्याची घोषणा नुकतीच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पावसाळी अधिवेशनात विधीमंडळात केली.आहे तरीही यातूनही पळवाट काढत हा गोरख धंदा सुरूच राहिली असे मत एका जेष्ठ शिक्षकाने व्यक्त केले.
आम्ही स्वत: घरापर्यंत जात नाही…
आम्ही आमचे खाजगी क्लास काढले असले तरी त्या करिता आम्ही आमच्या कडेच प्रवेश घ्या यासाठी आग्रही नसतो किवा त्या करिता घरा पर्यंत ही जात नाही पालक स्वत:च आमच्या पर्यंत येत असतात.खाजगी क्लास लावावा कि न लावावा हा ज्याचा त्याचा अंतर्गत प्रश्न आला.असे मत एका खाजगी क्लास चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले
चिंतेची बाबखाजगी क्लासेसमुळे विद्यार्थी आणि शाळांचा शैक्षणिक दर्जा ढासळत असून ही चिंतेची बाब आहे.ज्यांनी परस्थिती चांगली ते क्लास लावू शकतात परंतु ज्यांना दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न आहे.त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेची जबाबदारी कोणाची.यामुळे खाजगी क्लासेस बंद झाल्यावर सहाजिकच शाळांच्या गुणवत्तेच्या जाबादाऱ्या वाढतील आणि सारे एका समान प्रवाहात येतील.:- सौदामिनी कांबळे,समाजिक कार्यकर्त्या
( पूर्व प्रसिद्धी पुढारी ०२-०८-२०१५ )