मंगळवार, २६ मे, २०१५

पुरंधरचा ' शेंदूर '

    शिव छत्रपतींच्या स्वराज्यातील एक बलाढ्य मजबूत गड किल्ले पुरंधर आणि या गडावर निष्ठेची आठवण करू न देणारा शेंदूर बुरुज कोणी त्याला   शेंदऱ्या बुरुज म्हणूनही संबोधतो , किल्ले बांधणीच्या वेळी पद्मावती तळ्याच्या वायवेस बालेकिल्ल्याच्या बाजूला बुरुज बांधताना तो वेळो वेळी कोसळत होता . स्वराज्याच्या संरक्षणा साठी या बुरुजाचे उभे राहणे आवश्यक होते त्या वेळी या गडाला च आपले स्वराज्य आणि कुटुंब मानणाऱ्या येसाजी नाईक चिव्हे यांनी आपला  पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला.कुटुंबाच्या सुखापेक्षा स्वराज्याचे सुख त्यांनी आपले मानले . असा निष्ठावंत शेंदूर बुरुज पाहण्यासाठी किल्ले पुरंधर ला जायलाच हवे
              सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर वसलेले आहे. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्ऋत्येला ६ मैलांवर आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.

  •  बिनी दरवाजा : पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकर्याच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते. त्याचे नाव 'पुरंदरेश्वर'.
  • पुरंदरेश्वर मंदिर : हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे. हे साधारणपणे हेमाडपंती धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
  • रामेश्वर मंदिर : पुरंदेश्वर मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशवांच्या दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथने तो वाडा बांधला होता. या वाड्याच्या मागे विहीर आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर १५ मिनिटातच दिल्ली दरवाजापाशी येतो.
  • दिल्ली दरवाजा : हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात.
  • खंदकडा : दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खंदकडा. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखान्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात. वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेने गेल्यावर केदार दरवाजा लागतो.
  • पद्मावती तळे : मुरारबजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.
  • शेंदऱ्या बुरूज : पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे. त्याचे नाव शेंदऱ्या बुरूज.
  • केदारेश्वर : केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायऱ्या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहिडा, मल्हारगड, कर्हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.
  • पुरंदर माची : आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणाऱ्या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरावखिंडीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात.
  • भैरवगड : याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.
  • वीर मुरारबाजी : बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे..

                                                                                                                        श्रीकांत बोरावके


मंगळवार, १९ मे, २०१५

राजगुरू स्मारकाची उपेक्षा संपणार तरी केंव्हा …!


                   देश स्वातंत्र्य होऊन आज साठी उलटली तरी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांची उपेक्षा संपलेलीच नाही असे वाटावे असेच चित्र सद्या खेड तालुक्यात आहे.२३ मार्च १९३१ रोजी आपले सहकारी भगतसिंग,सुखदेव यांचा सह देशासाठी फासावर जाणाऱ्या शिवराम हरी राजगुरुंची हि जन्मभूमी.२३ मार्च च्या त्या शांत आणि काळवंडलेल्या सायंकाळी हा क्रांतिवीर देशासाठी हुतात्मा झाला परंतु त्यांच्या मृत्यू नंतर प्रकाशमान सकाळ कधीच उगवली नाही. असेच म्हणावे लागेल.कारण त्याचा नावाने प्रमाणित करण्यात आलेल्या राजगुरुनगर तालुक्यात त्यांचेच स्मारक निधी,आणि भ्रष्ठाचार यांच्या गर्दीत गुरफटले आहे.
                   अजूनही त्यांच्या स्मारकाचे सुमारे नवद्द टक्के काम बाकी असून या बाबत कसलाच पाठपुरावा होत नसल्याचे चित्र आहे. जी उभारले आहे त्यात ही निकृष्ठ दर्जा आहे गेल्याच पावसाळ्यात वाड्यातील अंतर्गत जमीन खचली होती.संरक्षक भिंतीचे काम हि अपूर्ण आहे .राजगुरूंचा पुतळा हि मेघडंबरी विनाच उभा आहे तो हि एवढ्या मोठ्या नगरीत दिसून न येण्या इतका अगदी कापसाच्या गादीत सुई ठेवल्या सारखा. 
                  जमिनींचे वाढते दर,औद्योगिक वसाहती ,खेड शेज,या आणि अशा विविध कारणांतून प्रसिद्धीत असलेल्या खेड तालुक्यात आणि राजगुरुनगर मध्ये हुतात्मा राजगुरूंचा केवळ दीड ते दोन फुटांचा अर्ध पुतळाच असणे हि अत्यंत खेदाची बाब आहे. दुसरीकडे तालुक्यात इतर महापुरुषांचे पुतळे अत्यंत आकर्षक आणि थाटामाटात उभे असून राजगुरुंच्याच पुतळ्याची आणि स्मारकाची अशी उपेक्षा का असा प्रश्न उपस्थित होतो.
                    त्यांच्या हुतात्मा दिनीच सर्वांना पुतळ्याची आणि स्मारकाची आठवण येईल मग पुन्हा विचारांचा जागर होईल. आश्वासनांची खैरात होईल आणि पुन्हा सगळ शांत हि… ! हि गेल्या कित्येक वर्षांची कैफियत आहे ती  बद्दलायला हवी तरच स्मारकाची आणि खऱ्या अर्थाने राजगुरूंची उपेक्षा थांबेल अन्यथा या देशा वर पुढे जीव द्यायला आणि देशा साठी जीव घ्यायला माणस उभी राहणार नाहीत अशी  हि शक्यता नाकारता येत नाही.

कोण्या एका कवीची ओळ या वेळी अधोरेखित करावीशी वाटते 


"सरणावरती आज आमची पेटताच प्रेते 
उठतील या ज्वालान मधुनी भावी क्रांतीचे नेते. 
लोह दंड तव पाया मधले खळा खळा तुटणार आई खळा खळा तुटणार 
गर्जा जय जय कार क्रांतीचा गरजा जय जय कार "

वरील कवितेचा भावार्थ पाहता खरच त्यांचा हुतात्म्याला खरी श्रद्धांजली ना तुम्ही आम्ही देऊ  शकलो ना राज्यशासन ना भारत सरकार देऊ शकले त्यांच्या स्मृती अजूनही तशाच आहेत उपेक्षितच … हि उपेक्षा संपवण्यासाठी स्थानिक तरुण प्राणपणाने प्रयत्न करतायेत हिच जमेची बाजू . नाही तर बाकी सगळी नाणी खोटीच असेच म्हणावे लागेल .
 
:-  श्रीकांत बोरावके.

( प्रसिद्धी दैनिक जनप्रवास,पुणे २२-०३-२०१४ )

सोमवार, १८ मे, २०१५

माझे जीवाचे आवडी पंढरपुरा नेईन गुढी …… !


एकदा तरी अनुभवावा असा पालखी सोहळा यंदाहीमार्गस्थ होईल .आशिया खंडातील सर्वात मोठा पायी वारी सोहळा म्हणून ज्याचा उल्लेख करावासा वाटतोतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संततुकाराम महाराज पायी वारी पालखी सोहळा होय.अत्यंत तळमळीने यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वैष्णावास पंढरीची ओढ लागलेली असते आणि त्याच एका ओढीने मार्गावर चालताना त्यांना कसलाही थकवा जाणवत नाही हे विशेष.  त्याच प्रमाणे या वारीत चालणारे अनेख भक्त हे हौसे,गौसे,नवसे असतात हे तितकेच खरे आहे.आपल्या रोजच्या जीवनापेक्षा काहीतरी हटके व वेगळे करू इच्छिणारे तरुणही या वारीत सहभागी असतात आणि या हि पेक्षा यात सहभागी असतो तो बळीराजा ज्याला आपले शेत पावसाच्या पाण्याने चिंब भिजावे वाटते. अशी आर्जव घेऊन तो त्या वाटेला चालत असतो. वारीत असतात लहान मुले ज्यांची भक्ती हि निर्लभ असते ज्यांचा प्रवास ज्या निर्लभतेने सुरु असतो त्याच निर्लभतेने संपतो त्या सावळ्या कानड्या विठ्ठला जवळ या बालकांचे काहीही मागणे नसते या मुळे ज्या आनंदी ते मुद्रेने यात सहभागी असतात त्याच आनंदी मुद्रेने वारीच्या शेवटापर्यंत असतात.अशी हि वारी प्रत्येकाला काही तरी बोध देणारी जगण्याची शिदोरी देणारी असते.आता हेच पहा न वारीच्या प्रवासात ऊन,वारा,पाऊस आणि खडतर रस्ते लागतात यात कधी कधी पायही थकतात पण क्षणभर विश्रांती घेऊन वारकरी पुन्हा वाटचाल सुरु करतात कोणत्या आशेने तर त्या पंढरीच्या आशेने हेच तर जीवनाचे गमक आहे.आपले ध्येय,जीवन कार्य एकदा ठरवले कि मग कितीही खडतर रस्ते येवोत पण आपल्या द्येयापार्यंत पोहचायचेच हे शिकवणारी हि वारी आहे.वारी बरेच काही सांगून जाते आपल्या वाटचालीत वारी समतेचा संदेश देते,वारी जाती अंताची आरोळी देते.या वारीत विविध जाती धर्माचे लोक आस्थेने सहभागी होतात.  इथे वेगळा विदर्भ नसतो कि वेगळा कोकण इथे प्रत्येक जन आपण एकच वैष्णव आहोत .या एकाच भावनेने एकरूप झालेला असतो याच मुळे कितीही जातीय दंगली घडवल्या तरी हा महाराष्ट्र त्या दंगलिंला भिक घालत नाही तो समतेचा आणि पुरोगामित्वाचा आपला वसा जोपासत राहतो.या वारीचा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण मद्य आहे. महाराष्ट्र म्हंटल कि वारी आणि वारी म्हंटल कि महाराष्ट्र हे जणू प्रत्येक पर्यटकाच्या विदेशी व्यक्तींच्या मनावर गोंदूनच गेले आहे.  आजही या वारीत परदेशी पर्यटक आस्थेने सहभागी होत असतात .  
                          वारी अनेख संधी हि प्रधान करते नवे काही शिकण्याची, रोजगाराची…पालखी मार्गावर भक्तांच्या सोयीसुविधा उपलब्ध करताना अनेख छोठे छोठे व्यवसाय बेरोजगारांसाठी उपलब्ध होत असतात त्यातील येणारे उत्पन्न निश्चितच नवा कायमस्वरूपी व्यवसाय उभारण्यासाठी उपयोगाचा ठरणारा असतो.वारीबरोबर चालणारे अनेख भक्त आपला परंपरा गत व्यवसाय जोपासताना दिसून येतात अगदी उल्लेखच करावासा झाला तर या वारीत सहभागी झालेले नाभिक सामाज्याचे लोक ज्यांचा व्यवसाय हि जोपासला जातो आणि भक्तीभाव सुद्धा.हि वारी कलेलाही दाद देणारी असते या वारीत काही ठिकाणी मुक्कामी तमाशा फडही वारकर्यांच्या करमणुकी साठी असतात या बरोबरच वारीतील काही वारकरी भारुडही सादर करतात एका अर्थाने वारी म्हणजे महाराष्ट्राची लोकसंस्कृती दाखवणारी एक मोठी फेरीच असते जी समृद्ध महाराष्ट्राचा वसा आणि वारसा सांगते.अशी हि सर्व गुण संपन्नवारी एकदा तरी अनुभवावी अशीच आहे. याच साठी प्रत्येक वैष्णव मोठ्या आनंदाने म्हणत असतो ''माझी जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी'' .जी आपल्या जीवाला आनंद,प्रेम आणि सुंदर प्रेमळ सहवास देते ती वारी आणि गुढी रुपी झेंडा त्या पंढरपुरास नेईलच अशी भावना त्या प्रत्येक भक्तात असते जो काम,क्रोध,लोभ,आणि मत्सर सोडून या वारीत चालत असतो. 
                                                                                                 : -   श्रीकांत बोरावके

(प्रसिद्धी :- दैनिक जनप्रवास,पुणे २५-०६-२०१४)

काही तरी हिशोब चुकतोय …?

श्रीकांत बोरावके
---------------------------------------------------------------------------------------------
                                  जगाचे  पोट भरणाऱ्या बळीराजाला विरंगुळा नसतो का ? कि त्याला मन नसतेच असेच असेल कारण मन असते तर त्याच्या या मनाचा विचार निदान त्या प्राणी मित्र संघटनानी केलाच असता . प्राणी मित्र संघटनांचे म्हणणे निदान तूर्तास खरे
मानू या... विचार करा ? आता बैल गाडा बंदी झालीच फेरविचार याचिका हि बळीराज्याच्या विरोधात गेली मग काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी एक शर्यतींवर अवलंबून असणारी आर्थिक घडी कोलमडून जाईल ,दोन या वर उभे राहिलेल्या ग्रामीण भागातील तरुणांचे लघु व्यावसाय बंद होतील ,तीन आणि अगदी महत्वाचे ज्या शेतकऱ्यांकडे शेतीचे सोडून इतर गाड्याची बैले आहेत त्यांचे पुनर्वर्सन कोठे व कसे करणार ,चार बाजारात ही बैलांची खरेदी मंदावेल, ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडेल मोठ्या प्रमाणात रक्कम लावून खरेदी केलेली बैले मातीमोल किंमतीत विकावी लागतील याचा फटका खिल्लार जमाती जोपासून उत्पन्न कमावणाऱ्या शेतकऱ्यांना होईल.अशा बैलांची निगा राखण्यासाठी वेतनावर काम करणारे मजूर बेकार होतील.शेतीची कामे करून फावल्या वेळेत शर्यतीत मग्न होणारे तरुण वाटा चुकतील कारण जीवनात केवळ कष्ठ हा एकच पर्याय समजणाऱ्या ग्रामीण तरुणांचा हाच विरंगुळा होता तोही बंद झाल्यावर इतर विरंगुळ्याच्या वाटा कोणत्या ? हो आणि सर्वात महत्वाचे या सर्वान मुळे  ग्रामीण यात्रेचा परंपरेचा पारंपारिक ठेवा कायमचा हिरावणार आहे त्याच काय ? पुण्या मुबंईला स्थाईक झालेली ग्रामीण जनता निदान या यात्रेच्या काळात आपल्या गावाची वाट धरायचे ती वाट हि आता बद्दलली जाईल . 
                                   मा.सर्वोच्य न्यायालयाच्या म्हणण्यानुसार पृथ्वी तलावर प्रत्येक प्राण्याला आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा नैसर्गिक हक्क आहे . या मुळे कोणत्याही प्राण्याचा अमानुष छळ कायद्याने गुन्हा आहे. आणि म्हणूनचं या विचारांचा आधार देत मा. सर्वोच्य न्यायालय शर्यत बंदी करते आहे . परंतु या बंदीचा होणारे  विपरीत परिणाम न्यायलया समोर मांडायला हवेत  ते  असे  कि इतक्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या बैलांची शर्यत बंदी मुळे गरजच संपल्यावर  त्यांचे पुनर्वर्सन कोण करणार ज्या शासनाला अद्यापही गाईंचे पालनपोषण यथोचित पणे करता आले नाही ते बैलांचे पालन पोषण कसे करणार.  आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या मशागती साठी बैलांची गरज आता नगण्यच राहिली होती.  त्यात त्यांचा वापर शर्यतीत होत होता तो हि बंद झाल्यावर त्यांची काळजी कोण आणि कशासाठी घेईल.
                                    स्वत: जाडे भरडे गहू खाऊन बैलांना मैद्याची कणिक खायला घालून शर्यतीत उतरवणारा बळीराजा कोणाला दिसत नाही,घरातील व्यक्ती मयत झाल्यावर ज्या प्रमाणे दु:खवटा पाळला जातो त्याच  प्रमाणे आपला शर्यतीतला बैल मयत झाल्यावर त्याची दशक्रिया आणि दु:खवटा पाळणारा बळीराजा कोणाला दिसत नाही आणि घरात खायला मीठ नसतानाही बैलाची नीठ निघा राखणारा बळीराजा तर कोणालाच दिसत नाही सर्वांना दिसतो तो अमानुष छळ करणारा आणि केवळ बैलांचे हाल करणारा क्रूर शेतकरी या विदारक अवस्थेचा सर्वांगाने विचार व्हायला हवा अन्यथा मिळालेला न्याय हा  अन्याय वाटण्यास वेळ लागणार नाही . प्राणी मित्र संघटनांची बाजू जरी  विचारात घेतली तरी काही राज्यांच्या प्रमाणात महाराष्ट्रात शर्यतीत बैलांचा छळ कमी प्रमाणात होतो हे सत्य नाकारता येणार नाही . शर्यतीत काही प्रकार अत्यंत सुंदर आणि छळ विरहित आहेत त्यांना तरी निदान या बंदीतून वगळायला हवे नाहीतर कुठे तरी सर्वांचाच हिशोब चुकतोय असेच म्हंटल तर वावग ठरू नये . अर्थात फेरविचार याचिकेवर मा.सर्वोच्य न्यायालय सर्व हिताचाच निर्णय देईल यात शंका नाही .

(पूर्व प्रकाशित : दैनिक जनप्रवास ,पुणे १०-०५-२०१४)

सुरवात एका वादळाची ……!

                         सह्याद्रीच्या निर्भीड दऱ्या खोऱ्याना साक्षी ठेवून या मावळ मातीतील सवंगगड्यांना सोबतीला घेऊन. छत्रपती शिवाजी राज्यांनी रोहीडेश्वरावर घेतलेली स्वराज्याची शप्पथ म्हणजे तत्कालीन मोगल साम्राज्या विरोधातील एक वादळच होते . या वादळाची सुरुवात महाराज्यांनी ज्या गडाच्या विजयाने केली . तो हा झुंजार किल्ले तोरणा ……पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला एक बलाढ्य किल्ला . तोरणा आजही एक शांत आणि निसर्ग रम्य स्थान म्हणून पर्यटकांना भुरळ घालतोय . तोरणा म्हणजे एक गिरी दुर्ग प्रकाराचा जमिनी पासून उंची साधारण १४०३ मीटर मध्यम चढाईचा हा गड याला कोणी तोरणा म्हणत तर कोणी प्रचंडगड . शिव विजया मुळे या किल्ल्याचे नाव तोरणा पडले असे म्हंटले जाते परंतु गडावर तोरण नावाची वनस्पती आढळते म्हणून याला तोरणा असे नाव पडले असे ऐतिहासिक ग्रंथात नामोउल्लेख आढळतो.पुढे राज्यांनी या वर विजय संपादन केल्यावर याचे नाव बदलून प्रचंड गड असे ठेवले . गडाच्या दक्षिणेस वेळवंडी नदी तर उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे.गडाच्या पश्चिमेला कानद खिंड ,पूर्वेला बामन व खरीव खिंडी आहेत . गडाचा विजय आणि गडाचे नाव याचा साधर्म्य संबंध नसला तरी येवढे मात्र खरे आहे कि हा गड सर करूनच शिव छत्रपतीनी स्वराज्याचे वादळ उठवले आणि बघता बघता हे वादळ दिल्ली च्या तक्ता पर्यंत पोहचले ….पुढे पेशवाईत याच वादळाने अटकेपार झेंडे रोवले .
                        गडावर प्राचीन वस्तूंची सध्या मोडकळीस आलेली अवस्था आहे . सर्व वाडे , बुरुज , व इतर ठिकाणांची नासधूस झाली आहे . तरीही या ''तोरण्याचे तोरण सौंदर्य क्षणमात्र हि कमी झाले नहिऎ हे विशेष ''.या  ''सौंदर्याकडे केवळ पाहायला नाही .जगायला या येथून दिसणारा सूर्योदय तुम्हाला नवीन जगण्याची उर्मी देईल तर येथील सूर्यास्थ आपल्याला  उगवती ते मावळतीचे क्षण एकाच क्षणी दाखवेल यात शंका नाही'' . 
या गडाच्या एकंदरीत रचणे वरून हा शैवपंथी यांचा आश्रम असावा,इ.स १४७०ते १४८६ च्या दरम्यान हा गड बहमनी राजवटीत मलिक अहमद ने जिंकला पुढे निजामशाहीत व तद्नंतर महाराज्यांकडे आला. महाराज्यांनी गडावर इमारती बांधल्या आग्र्यावरून सुटकेनंतर राज्यांनी गडाच्या    जीर्णोधारासाठी रुपये ४ हजार होन खर्च केला होता.संभाजींच्या वदानंतर गडावर मोगलांचे राज्य आले . पुढे सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड मराठी छत्र छांयेत आणला . या गदा बाबत ची एक महत्वपूर्ण आठवण अशी कि संपूर्ण भारतावर अधिराज्य निर्माण करणाऱ्या औरंगजेब बादशहाला महाराष्ट्रातील केवळ हा एकमेव किल्ला स्वत:जिंकता आला महाराज्यांच्या केवळ एकाच गडावर विजय मिळवून त्याला समाधान मानावे लागले .
                      या तोरणा गडावर विशेष पाहण्या सारखे काही नाही जे आहे ते हिंदवी स्वराज्याचे वैभव सांगणारे लाल मातीचा गुणधर्म ऎकवनारे आणि निसर्गाच्या सानिध्यात नेणारे असेच आहे . 

                                                                                                               -: श्रीकांत बोरावके