सह्याद्रीच्या निर्भीड दऱ्या खोऱ्याना साक्षी ठेवून या मावळ मातीतील
सवंगगड्यांना सोबतीला घेऊन. छत्रपती शिवाजी राज्यांनी रोहीडेश्वरावर
घेतलेली स्वराज्याची शप्पथ म्हणजे तत्कालीन मोगल साम्राज्या विरोधातील एक
वादळच होते . या वादळाची सुरुवात महाराज्यांनी ज्या गडाच्या विजयाने केली .
तो हा झुंजार किल्ले तोरणा ……पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील
पर्यटकांचे आकर्षण असलेला एक बलाढ्य किल्ला . तोरणा आजही एक शांत आणि
निसर्ग रम्य स्थान म्हणून पर्यटकांना भुरळ घालतोय . तोरणा म्हणजे एक गिरी
दुर्ग प्रकाराचा जमिनी पासून उंची साधारण १४०३ मीटर मध्यम चढाईचा हा गड
याला कोणी तोरणा म्हणत तर कोणी प्रचंडगड . शिव विजया मुळे या किल्ल्याचे
नाव तोरणा पडले असे म्हंटले जाते परंतु गडावर तोरण नावाची वनस्पती आढळते
म्हणून याला तोरणा असे नाव पडले असे ऐतिहासिक ग्रंथात नामोउल्लेख
आढळतो.पुढे राज्यांनी या वर विजय संपादन केल्यावर याचे नाव बदलून प्रचंड गड
असे ठेवले . गडाच्या दक्षिणेस वेळवंडी नदी तर उत्तरेला कानद नदीचे खोरे
आहे.गडाच्या पश्चिमेला कानद खिंड ,पूर्वेला बामन व खरीव खिंडी आहेत . गडाचा
विजय आणि गडाचे नाव याचा साधर्म्य संबंध नसला तरी येवढे मात्र खरे आहे कि
हा गड सर करूनच शिव छत्रपतीनी स्वराज्याचे वादळ उठवले आणि बघता बघता हे
वादळ दिल्ली च्या तक्ता पर्यंत पोहचले ….पुढे पेशवाईत याच वादळाने अटकेपार
झेंडे रोवले .
गडावर प्राचीन वस्तूंची सध्या मोडकळीस आलेली अवस्था आहे . सर्व वाडे ,
बुरुज , व इतर ठिकाणांची नासधूस झाली आहे . तरीही या ''तोरण्याचे तोरण
सौंदर्य क्षणमात्र हि कमी झाले नहिऎ हे विशेष ''.या ''सौंदर्याकडे केवळ
पाहायला नाही .जगायला या येथून दिसणारा सूर्योदय तुम्हाला नवीन जगण्याची
उर्मी देईल तर येथील सूर्यास्थ आपल्याला उगवती ते मावळतीचे क्षण एकाच
क्षणी दाखवेल यात शंका नाही'' .
गडावर प्राचीन वस्तूंची सध्या मोडकळीस आलेली अवस्था आहे . सर्व वाडे ,
बुरुज , व इतर ठिकाणांची नासधूस झाली आहे . तरीही या ''तोरण्याचे तोरण
सौंदर्य क्षणमात्र हि कमी झाले नहिऎ हे विशेष ''.या ''सौंदर्याकडे केवळ
पाहायला नाही .जगायला या येथून दिसणारा सूर्योदय तुम्हाला नवीन जगण्याची
उर्मी देईल तर येथील सूर्यास्थ आपल्याला उगवती ते मावळतीचे क्षण एकाच
क्षणी दाखवेल यात शंका नाही'' .
या गडाच्या एकंदरीत रचणे वरून हा शैवपंथी
यांचा आश्रम असावा,इ.स १४७०ते १४८६ च्या दरम्यान हा गड बहमनी राजवटीत मलिक
अहमद ने जिंकला पुढे निजामशाहीत व तद्नंतर महाराज्यांकडे आला. महाराज्यांनी
गडावर इमारती बांधल्या आग्र्यावरून सुटकेनंतर राज्यांनी गडाच्या
जीर्णोधारासाठी रुपये ४ हजार होन खर्च केला होता.संभाजींच्या वदानंतर
गडावर मोगलांचे राज्य आले . पुढे सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक
चढवून गड मराठी छत्र छांयेत आणला . या गदा बाबत ची एक महत्वपूर्ण आठवण अशी
कि संपूर्ण भारतावर अधिराज्य निर्माण करणाऱ्या औरंगजेब बादशहाला
महाराष्ट्रातील केवळ हा एकमेव किल्ला स्वत:जिंकता आला महाराज्यांच्या केवळ
एकाच गडावर विजय मिळवून त्याला समाधान मानावे लागले .
या तोरणा गडावर विशेष पाहण्या सारखे काही नाही जे आहे ते हिंदवी स्वराज्याचे वैभव सांगणारे लाल मातीचा गुणधर्म ऎकवनारे आणि निसर्गाच्या सानिध्यात नेणारे असेच आहे .
या तोरणा गडावर विशेष पाहण्या सारखे काही नाही जे आहे ते हिंदवी स्वराज्याचे वैभव सांगणारे लाल मातीचा गुणधर्म ऎकवनारे आणि निसर्गाच्या सानिध्यात नेणारे असेच आहे .
-: श्रीकांत बोरावके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा